Monday, May 12, 2014

सुख म्हणजे??



प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, चांगल आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतता, त्यामुळे सुखासाठी पळत्याच्या पाठी न लागता जे आहे त्यातच समाधान माना आणि आहे ते चांगल आहे अस मानून पुढे चालत राहा.
आपण खुपदा अनुभवी माणसाणांकडून ऐकत असतो, मूड चांगला असला की आपल्याला ते सगळ पटत सुद्धा (मोठ्यांच बोलन ऐकून घेण ही सुद्धा एक कला असल्यामुळे त्याला असावा मूड लागतो.) आणि कधीकधी आपण खरच असल्या काहीशा गोष्टींवरती विचार करत बसतो कारण त्या काहीतरी खर सांगत असतात.
पण खुपदा ह्या रोजच्या दगदगीमधे पुन्हा आपण हरवतो. मनाला आणि शरीराला बर वाटेल अशा गोष्टीमधे पुन्हा फक्त सुख शोधू लागतो. जी व्यक्ती आपल्याला आनंदी ठेवतेय किंवा ज्या व्यक्तीच्या सहवासात आपण आनंदी आहोत त्यांच्या कडेच आपण झुकत रहातो.
परंतु त्याच वेळी ज्या व्यक्ती आपल्याला आपल्याला (वाटणारा) त्रास देतात, ज्यांना पाहिल्यावर आपल्या आनंदावर विरजण येत किंवा आपल्याला दुःख होत राग येतो अशा व्यक्तीना मात्र आपण टाळत रहातो. आणि या व्यक्तीं मद्धे बघायला गेल तर आई-वडील, भाऊ-बहिण, आजी-आजोबा अशी मंडळी असते. म्हणजे बघायला गेल तर आपण आपल्याच माणसांना कंटाळतो, त्यांची काहीच किंमत ठेवत नाही. जिची पूजा करायला पाहिजे त्या आई-बहिणीच्या नावाने एकमेकांना शिव्या घालतो. म्हणजे त्यांच्या वरचा खरतर तिरस्कारच आपण लोकांसमोर मांडत असतो.
पण का?? कारण ते उगाच इरिटेट करतात, नको असतानाही 'लेक्चर' देत बसतात न ऑल.
खरतर हीच लोक आपल्या हितासाठी आपल्या सुखासाठी आपल्याला बोलत असतात हे मात्र आपण विसरतो, आणि क्षणभंगुर अशा काही 'सुंदर' बोलणाऱ्या लोकांकडे आपण आकर्षित होतो.
माझ ही तसच, आईची आणि माझी सर्रास भांडण होत असतात. मी ही रागाच्या भरात तिला काहीही बोलून कुठेतरी जातो, ती मात्र रोज माझी अरेरावी ऐकून घेत असते, आणि काहीही न बोलता मागच सगळ विसरून रोज सकाळी हसऱ्या चेहऱ्याने माझ्या सुंदर दिवसाची सुरवात करते.
शेवटी आपली ती आपलीच मानस असतात, हे फ़क़्त आई साठी नसून माझा भाऊ, पप्पा, माझे खूप सारे मित्र आणि 'ती' सुद्दा. सगळे मला समजून घेतात आणि प्रत्येक दिवशी आपल्या वाट्याला येणार्या सुखाच्या काही ओंजळी माझ्यावर उधळतात. म त्यांच्यामुळे झाला, तरी थोडासा त्रास आपण का नाही समजून घ्यावा.
सुख म्हणजे पैसा, घर, गाडी, चिकणी गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंड हे आहे, की आईच्या हातचा धपाटा, बाबांचे हळूच मारलेले टोमणे, मित्रांनी भांडून वाटून खाल्लेला वडापाव आणि तिने/त्याने अचानक फोन करून म्हटलेल 'i love you.'
पैसा तो हात का मैल है, आणि कमवायला अख्ख आयुष्य पडलय. पण आपल पाकीट अगोदरच इतक्या प्रेमळ माणसांनी भरलय तर अजून कशाची गरज आहे.
आहे ते एंजॉय करायच बस्स, और क्या चाहिये जिंदगी से.

No comments:

Post a Comment