Monday, July 21, 2014

रंग प्रेमाचा

सौरभ पाटील. माझा जवळचा मित्र.
पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं.
वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सुट्टी टाकून गावाला यायचं.
दोन वर्षापूर्वी त्याच एका मुलीशी लग्न झाल.
अर्थात पोरग एकमार्गी असल्याने घरच्यांनी ठरवून आणि मुलगी बघण्याचे सोपस्कर वैगेरे करून थाटामाटात लग्न एकुलत्या एक पोराच लग्न लावलं.
राजश्री. अगदी लाखात एक अशीच राजकन्या. अतिशयोक्ती असली तरी चारचौघीत उठून दिसणारी.
शिवाय चांगलीच शिकलेली.
लग्न झाल्यावर दोन तीन महिने नव्या पोरीच्या बागडण्याने कसे गेले हे कुणालाच कळले नाही.
आता सौरभ ची कामावर रुजू व्हायची वेळ आली.
परंतु ह्याच फिरस्तीच काम असल्यामुळे राजश्रीला तो गावीच ठेवून गेला.
पहिले काही महिने अर्थात राजश्रीला त्रासाचे गेले. बोलायला अस घरात फक्त सासू-सासरे.
त्यामुळे राजश्रीच माहेरी जाण वाढू लागलं. ती महिना महिना तिकडेच राहू लागली.
सौरभचे आईवडील आणि स्वतः सौरभ सुद्धा फार समंजस असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल.
परंतु राजश्री च्या मनात दुसराच खेळ होता.
तिचा कॉलेजचा एक मित्र तिला आवडायचा. आधी हिने कधी दाखवून दिल नव्हत, परंतु का कुणास ठावूक, लग्नानंतर हि त्याच्याकडे पुन्हा आकर्षली गेली.
आणि याचं प्रेम फुलू लागलं.
आता ती सौरभला टाळू लागली. त्याचा फोन, त्याचे Skype mails, कशालाच तीने उत्तर दिल नाही.
सौरभने तिच्यासाठी सगळ सहन केल. आई-वडिलांना या बाबत त्याने कधीच काही सांगितलं नाही.
त्यातच काही जागतिक आर्थिक हालचाली मुळे त्याने केलेला सुट्टीचा अर्ज फेटाळला गेला आणि त्याची रजा सहा महिने पुढे ढकलली गेली. हे दोन वेळा झालं.
आणि एक दिवशी अचानक राजश्रीचा त्याला फोन केला.
"'मला जेव्हा तुझ्या प्रेमाची गरज होती तेव्हा तू दोन वर्ष माझ्यापासून लांब राहिलास. तू तिथे मजा करत असशील, पण कधी माझा विचार केलास. माझ काय होत असेल इकडे. पण त्याच वेळी मला विशाल ने आधार दिला. त्याने मला माझ हरवलेलं प्रेम दिलंय. आणि आता आम्ही एकत्र राहण्याचा विचार केलाय. तुला एवढ्यासाठीच सांगतेय कि डिवोर्स चे पेपर्स तुला पाठवलेत, ते एवढे सही करून परत पाठव."
गेल्या महिन्यात ते पेपर्स परत आले, परंतु त्यासोबत सौरभचा मृतदेह सुद्धा होता.
मुद्दा हा, कि आजकाल आपण क्षणिक प्रेमासाठी इतके हपापालेलो आहोत कि आज हा किंवा हि तर उद्या त्याठिकाणी कुणी दुसराच किंवा दुसरीच असेल.
परंतु समाजात सौरभ सारखी सुद्धा मुल किंवा मुली आहेत हे मात्र विसरून जातो.
ज्याच्यासोबत साताजन्माच्या आणाभाका जर तुम्ही घेतल्या असतील तर दोन वर्ष त्रास सहन करायला काय जातंय.
प्रेमाला असाही एक रंग असतो हे मात्र नव्याने दिसून आलं.
चुकी दोघांचीही नाही म्हणा, चुकी आपल्या कम्यूनिटीची आहे.
जमाना बदललाय तरी लोक मात्र छत्तीस गुण जुळनारीच मुलगी किंवा मुलगा शोधतात, आणि म ती मुल अशाप्रकारे आपले छत्तीस गुण दाखवतात.
अरेंज कि लव्ह ह्या विषयात नाही घुसायचं नसलं तरी विचार येतातच.

- © Aakash Patil