Saturday, December 28, 2013

प्रेमात पडल्यावर

प्रेमात पडल्यावर 


पहिला सगळं ठरवायचं असतं
व्यवस्थित, विचारपूर्वक करायचं असतं
खुपदा भेटून बोलायचं असतं
एकमेकांची मनं जुळवायचं असतं
आवडी-निवडी जपायचं असतं
विशावासाचं नातं विणायचं असतं
कारण एकदा प्रेमात पडल्यावर
पुन्हा मागे वळायचं नसतं
#mimarathiap

Tuesday, December 24, 2013

विश्वास

मोठमोठे लेखक, विचारवंत, कवी किंवा कोणतीही अनुभवी व्यक्ती जेंव्हा प्रेम या गोष्टीबद्दल आपले विचार मांडत असतात, तेंव्हा ते त्यांच्या बोलण्यात प्रकर्षाने एका गोष्टीवर जास्त भर देतात ते म्हणजे 'नात्यांतला विश्वास'.
एखाद स्वच्छ, सुंदर, नितळ नातं जपण्यासाठी पहिल्यांदा त्या दोन व्यक्तीं चा एकमेकांवर पुर्ण विश्वास असणं गरजेच आहे. कारण एखादी चुकीची कृती सुद्धा काहीवेळा आपल्या नात्याला मारक ठरू शकते. त्यामुळे आपल्या व्यक्ती आणि तिच्यावरचा विश्वास मिळवण, विश्वास जपणं हे त्यावर प्रेम करण्या इतकचं महत्वाच आहे.
पण आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. खूप वेळा त्यांच्याशी खोट बोलतो, पाहिलं खोट लपविण्यासाठी अजून एखाद खोट बोलतो, मग त्या खोट्या गोष्टीची link इतकं मोठ स्वरूप धारण करते कि त्यानंतर आपण किती हि आदळ-आपट करून खर सांगायचा प्रयत्न केला तरी समोरच्या व्यक्तीच्या मनात ती सल कायम राहते.
कित्येक वेळा फक्त गैरसमजुतीतून सुद्धा असा तिढा निर्माण होतो, आणि ज्याची काहीच गरज नव्हती असे विषय सुद्धा त्यात आपल्या माथ्यावर येतात,
पळवाट काढणे हा तर विश्वास तोडण्याचा सगळ्यात सोपा मार्ग अस मला वाटत, कारण आपण एखाद्या गोष्टीपासून पळ काढत आहोत हे समोरच्या व्यक्तीला कळायला आजच्या generation मध्ये तरी जास्त वेळ लागताच नाही, आणि एकदा का शंकेची पाल चुकचुकली कि मग ती सगळ गिळंकृत केल्याशिवाय राहत नाही. आणि त्यावेळेस आपल्या बद्दल कोणीही काहीही सांगितलेल्या गोष्टी नात्यां मद्धे फुट पाडू शकतात. तेंव्हा योग्य आणि अयोग्य अस काहीच नसत, पण क्षणाक्षणाला द्वेष मात्र वाढत जातो.
ह्या सगळ्या पेक्षा आधीच सगळं clear केलेलं काय वाईट. 
काय असेल ते सरळ सांगा, खर सांगा,
खर सांगायला घाबरायचं कशाला?? 
हा त्यावेळेस व्यक्तीला वाईट वाटेल, चिडचिड होईल,
मात्र ते फक्त त्या वेळेसाठीच असेल, आणि थोडं समजावलं कि झाल,
पण उगाच आपला इगो बाळगून जर त्या नात्यातला गोडवा टिकेल अस वाटत असेल तर ते चुकीच ठरू शकत.
थोडा संवाद, थोड प्रेम, थोडी कुरबुर आणि थोडी मस्ती हे साध सोप गणित असत सुखी राहण्याचं.
जितका एकमेकांवर विश्वास वाढेल तितक ते नात दृढ होत जाईल,

बस्स !!

बाकी काय ,

आपल सगळंच सेम हाय...

Wednesday, December 4, 2013